मानसीचा चंद्रवेध तो
तुझे निरंतर लक्ष वेधतो
शास्त्रानुसार चंद्र मनाचा कारक आहे चांद्रयान ३ ने चंद्राबाबत जी माहिती मिळवली ती मनाशी तंतोतंत जुळणारी अशीच आहे.
चंद्रावर यान, लॅन्डर आणि रोव्हर काळजीपूर्वक, योजनाबद्ध उतरवावे लागले.
मनात उतरताना देखील अशी काळजी घ्यावी लागते नाहीतर मनातून कायमचे उतरावे लागते.
चंद्रावरील मातीतील
असंख्य घटकांपैकी काहींचे पृथःकरण करून झाले आहे.त्या मातीत पाणी आढळले.
मनात सुद्धा ओलावा असतोच की.
मनाच्या देखील काहीच घटकांचा अभ्यास झाला आहे..
कारण चंद्राप्रमाणे मनाचीही
एक बाजू कायम अंधारात असते.
चंद्राप्रमाणे मनात देखील अहंकाराची विवरे आणि
मी पणाच्या (रिकाम)टेकड्या असतात.
चंद्राला पृथ्वी शिवाय अस्तित्व नाही... मनालाही शरीराशिवाय स्वतंत्र अस्तित्व नसते.
चंद्रावर वातावरणाचा अभाव आहे.
मन देखील ज्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात येते तसे फिरत राहते..
स्वतः भोवती आणि त्याच्याभोवती.
एकूण काय...तर मनावर देखील भावनेचा "विक्रम" आणि बुध्दीचा "प्रग्यान" योजनाबद्ध अवतरला असेल तर माणूस मनाच्या जोरावर चंद्रच काय...कोणत्याही ग्रहावर जाऊ शकतो.
दुसऱ्याबद्दलचा पूर्वग्रह सोडता ...
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment