गीतांतराच्या गंमती...
ना जिया लागे ना
नेमका किती काळ लोटला माहित नाही ..पण कळायला
लागल्यापासुन हिंदी गाण्यांचा लळा लाग़ला. आणि आता आता, अगदी अलिकडे सुरु केलेल्या गीतांतरामुळे ग़ाण्याचे शब्द अधिक
प्रेमाने जवळ आले.
असेच एक अगदी लोकप्रिय गाणे... ना जिया लागे ना..
“आनंद” मधलं. ग़ाण्यातला विरही मूड पकडुन पहिलं कडवं सुचलं.
ना मन लागेना
ना जिया लागे ना
तुझ्याविना
माझे कुठे मन.. लागेना
तेरे बिना मेरा कहीं
जिया लागे ना
ना.. मन
लागे ना...
ना जिया लागे ना
विसरले जगणे
कुठे आठवत नाही
तू भेटलास
तेव्हा
स्पंदने
जाणवली ही
त्यानंतर एकच ओळ दोनदाच
येते गाण्यात. कडव्यांची शिस्त मोडुन... अतिशय सुंदरशी गाण्यातली जागा आहे तिथे ...
ना.. मन
लागे ना...
पिया तेरी बावरी से रहा जाए ना
केवळ “रहावत नाही” हे सांगण्यापुरतीच ही ओळ गाण्यात
दोन वेळा ऐकताना कानाला वेगळीच अनुभूती देऊन जाते. हे संगीतकाराची कल्पना कि कवी गुलझार
यांची... कल्पना नाही. दोघेही ग्रेटच.
तू जेव्हा जाशी कुठे जाशी कधी
तुम अगर जाओ कभी जाओ कहीं
समयास सांगु काही
वक़्त से कहना ज़रा
थांबुदे तसाच तो ही
वो ठहर जाए वहीं
ते क्षण तसेच राहोत ना वाहोत ना
वो घडी वहीं रहे ना, जाए ना
ना.. मन लागे ना...
ना जिया लागे ना...
नंतरचे हे कडवे खुपच खास आणि वेगळे.
यात कवीला नेमके काय म्हणायचे ते सहज कळत नाही. तु जेव्हा जेव्हा कुठे जाशील तेव्हा
समयास देखिल तसेच थांबायला सांगु.. असा समज होईल असे शब्द आहेत. जे या अर्थाने गाण्याच्या
मूडशी विसंगत वाटतात. प्रियकर जर कुठे दुर गेलाय आणि जर काळाला थांबवले तर तो आणखी
उशिरा नाही का येणार?
काही सुचेना की
असे का लिहिले असेल?
मग असं वाटलं की जेव्हा ती म्हणते
आहे की तु कुठे कधी जाशीलचा अर्थ तु माझ्याजवळ आहेसच नेहमी.. कायम...आणि कधी माझ्यापासुन
दूर जाण्याची वेळ आली तर काळाला तिथेच थांबायला सांगु..तो क्षण तिथेच थांबुन राहु दे
असा अर्थ तिच्या मानसी आणि कवीला अभिप्रेत असावा.
असो. एक सुंदर आनंददायी गाणं ऐकुन खुप समाधान
मिळतं एवढं मात्र खरं.
मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment