गाज वेळ
मिट्ट काळोखातून अंधार वाट काढत चालला आहे.किनाऱ्यावरून येणाऱ्या वाऱ्याच्या आवाजासोबत समुद्राची गाज ऐकू येते आहे..जणू अहोरात्र सुरू असलेलं एखादं मन. लहानमोठ्या भावनांच्या लाटा उठाव्यात आणि अस्तित्वाच्या किनाऱ्यावर येऊन आदळत रहाव्यात..अपेक्षांची वाळू क्षणभर ओली व्हावी ...आणि लाट ओसरताच कोरडी वाटावी. मी इथेच काठावर पडून असतो...स्वत: "वेळ" असूनही मी कुठेच जात नाही.वाळूतले प्रयत्नांचे प्रवाळ नेहमी नव्याने वाळूत नक्षी काढत असतात.. त्या नक्षीमुळेच दिवसा एखादा वाळूचा कण अभ्रकासारखा चमकत रहातो.मी मात्र रात्रीच्या चंद्रप्रकाशात चमकणारे कण आकाशासोबतच, किनाऱ्यावर देखील शोधतो.किर्र काळोखात दिवस देखील विसावून गेलाय..
मनातल्या अस्वस्थतेच्या सागराची जाणीव होऊ देत...सुखाची भरती असो अथवा दु:खाची ओहोटी... रात्रभर माझ्या सोबत आहे ही गाज. निरखत, ऐकत तटस्थ.. एक एक लाट..!
मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment