रंग फुलांचे, हृदयात लेऊन
लिहिली तुला मनोगते मी...
किती किती कसं काय,
छळतेस नितक्षणी,
सांगू तुला कसे मी....
तरीही स्वप्ने, पाहतो तुझी मी,
तुझ्या आठवणींत होतो मी जागा ...
तुझ्याच विचारात गुंतून जातो ,
जणू गजऱ्यात गुंफे धागा..
हा ..मेघ नि वीज, चंदन नि जलसे
अभंग प्रेम अपार..
घ्यावे लागतील,जन्म आपल्यास
कितीदा वारंवार..!
गीतांतर: मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment