चित्र वेध (चित्र सौजन्य:अनामिक)
लय विलय
हे चित्र स्थिर आहे..पाणी वाहताना दिसत नाही. बर्फाच्छादित शिखरांवरून येणारे वारे जाणवत नाहीत.झाडांची पाने हलत नाहीत.शोभिवंत खांबांच्या मध्ये तितकेच सुंदर कठडे आहेत. स्थिर असल्यामुळेंच टिपॉय वरील शुभ्र फुले पण कोमेजणार नाहीत.हे सर्व जणू काही थांबले आहे..निश्चल आहे.
कारण...
अजून मी तिथे पोहोचलो नाही.
मी जन्माला येताक्षणी हे चित्र सजीव होईल.ते माझे तीन मित्र ही येतील माझ्यासोबत.मला एकटे वाटू देणार नाहीत.माझ्या श्वासांनी झाडांची पाने हलू लागतील.जगण्याच्या सफरीत मला अडचणींचे अनेक डोंगर चढा उतरावे लागतील तेव्हा वाहणारे प्रयत्नांचे वारे मला उल्हसित करतील. जीवन प्रवाह वाहू लागेल.नैतिकतेच्या शोभिवंत खांबांमध्ये माझ्या भल्याबुऱ्या वर्तनाचे कठडे असतील.मात्र ती शुभ्र दिवसांची अन रात्रीच्या गडद हिरव्या देठांची फुले तेवढी मला रोज बदलावी लागतील.रात्रंदिवस माझे तीन मित्र सत्व,रज आणि तम...सोबत असतील ..भटकंती करत आम्ही इथे आलो असू आणि ते तिघे इथून निघून गेलेत.त्यांच्या रिकाम्या खुर्च्या आणि पुन्हा माझ्यासाठी निश्चल झालेले सारे जग ...तो क्षण मी टिपला आहे.
मला त्यात शोधू नका.
लेखन:मुकुंद इंगळे
No comments:
Post a Comment